Tuesday 9 August 2011

आपण

एकमेकांचा निरोप घेताना लपवले ते भाव आपण
दूर जाताना पुन्हा एकदा जवळ आलो तेच  आपण

दाटले मनी जरी गालांवर ना ओघळले
आसवांमध्ये भिजून झालो चिंब ते आपण

आठवणीना दूर लोटुनी पाहतोय भविष्याची स्वप्न
तरीही भूतकाळामध्ये रेगांळूनी अडकलो ते आपण

उष्ण श्वासांनी भरलेले कुठे गेले सारे ते क्षण 
गुंतलेल्या श्वासांमधुनी वेगळे झालो ते आपण

वेगळ्या वाटांनी  जरी आज चालतोय हे जीवन
हरवलं  ते नात शोधतोय तेच ते आपण  
 
यशवंत 

1 comment: